मुंबई /-
कोरोनाचा एक डोस घेतला असेल तर निश्चिंत राहा, कारण दिवाळीनंतर एका लसीच्या डोसवर कुठेही फिरण्याची परवानगी शासनाकडून देण्यात येणार आहे.याची अधिकृत घोषणा मुख्यमंत्री करणार आहेत. याबाबत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली आहे.कोरोनाचा प्रभाव आता संपल्यात जमा आहे. त्यामुळे लोकांना येणा-या अडचणी लक्षात घेता लसीची एक मात्रा देखील पुरेशी ठरणार आहे. त्यामुळे टास्क फोर्सच्या सहमतीने हा निर्णय घेण्यात येणार आहे.