वेंगुर्ले /-

वेंगुर्ला वेंगुर्ले शहरातील आनंदवाडी येथिल दलितवस्ती सुधार योजनेतून १० ते १२ वर्षापुर्वी झालेल्या कामांची अतिशय दैनावस्था झाली असून त्याचा त्रास नागरीकांना होत आहे. याबाबत येथिल नागरिकांनी वेंगुर्ला नगरपरिषद,नगराध्यक्ष, संबधित जागेवर जाऊन पाहणी केली. दलितवस्तीतील सांडपाणी वाहून नेण्यासाठी कार्यान्वित असलेल्या गटार योजनेतील हे गटार अनेक ठिकाणी फुटले असून याठिकाणी अनेक वेळा अपघात झाल्याचे तसेच वाहनचालक पादचारी गटारात पडुन अडकल्याची बाब लक्षात आली आहे.दलितवस्त्यातील सार्वजनिक शौचालयांचीही अतिशय दुरावस्था झाली असून शौचालयांचे दरवाजे निखळून पडत असून आतील फरश्या फुटून गेल्या आहेत.शौचालयाची मैला टाकी फुटली असल्याने परीसरात दुर्गधींचे साम्राज्य पसरले आहे.या सर्वामुळे येथिल नागरिकांच्या आरोग्याचा मोठा निर्माण झाला आहे. या सर्वाची तात्काळ दखल घेत वेंगुर्ला शहर शिवसेनेने नुकतीच पाहणी केली असून शहर शिवसेनेच्या वतीने सोमवारी नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे संबधित कामे तातडीने करण्यात यावी अथवा त्वरीत उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येणार आहे.यावेळी शिवसेनेचे शहराध्यक्ष अजित राऊळ,शहर समन्वयक विवेकानंद आरोलकर, शाखाप्रमुख हेमंत मलबारी, सुहास मेस्त्री, डेलीन डिसोझा, गजानन गोलटकर, राजू परब, नागरिक विठ्ठल जाधव, उदय जाधव आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page