मुंबई /-

मुंबई काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांनी आपल्या पाळत ठेवत असल्याचा केलेला आरोप हा माहितीअभावी केलेला आहे. त्यांनी त्यांच्या पक्षातील माजी मुख्यमंत्र्यांकडून याबाबतची माहिती घेऊन आरोप करावेत असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी सोमवारी त्यांना दिला आहे. महाराष्ट्रात उभी राहत आहे हे त्यांना माहीत आहे. त्यांच्या पायाखालची वाळू सरकत आहे. मी कुठे काय करतो ते सगळे त्यांना माहीत आहे. असे सांगत नाना पटोले यांनी आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचा आरोप केला होता. त्यास राष्ट्रवादीचे प्रवक्ते मलिक यांनी वरीलप्रमाणे उत्तर दिले आहे. नाना पटोले यांनी जे‌ आरोप केले आहेत. ते त्यांनी माहितीच्या अभावाने केले असावेत. कुठलंही सरकार असेल तरी अशा पद्धतीनं माहिती गृहखाते संकलित करीत असते. सुरक्षेच्यादृष्टीने राजकीय नेत्यांच्या दौऱ्यांवर लक्ष असते. हे आताच होते असे नाही. सुरक्षा यंत्रणा सतर्क करण्यासाठी हे प्रत्येक सरकारमध्ये होते. नाना पटोले यांनी त्यांच्या पक्षातील माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे किंवा पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून माहिती घ्यावी. त्यांनी माहिती न घेतल्याने ते असे आरोप करत आहेत, असे मलिक यांचे म्हणणे आहे. नाना पटोले यांना वाटत असेल त्यांच्या नेत्यांना, त्यांच्या पक्षाच्या कार्यक्रमाला पोलिस बंदोबस्त नको असेल तर त्यांनी तसे सांगावे, त्याबाबतचे पत्र गृह विभागाला द्यावे, असेही मलिक म्हणाले यांनी सांगितले. पटोलेंवर भडकले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांवर केलेल्या आरोपानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार चांगलेच संतापले असून नाना पटोले यांची भूमिका ही महाविकास आघाडीला सुरुंग लावणारी आहे, अशा शब्दांत अजित पवारांनी आपली नाराजी थेट मुख्यमंत्री यांच्याकडे व्यक्त केल्याचे खात्रिलायक सूत्रांकडून समजते. मुख्यमंत्री तसेच उप मुख्यमंत्र्यांकडून आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केल्याची बातमी सोमवारी प्रसारमाध्यमांमध्ये पसरली होती. यापार्श्वभूमीवर अजित पवारांनी आपली नाराजी व्यक्त केल्याचे समजते. पटोले यांच्या या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीला एकप्रकारे सुरुंग लावला जातोय. नाना पटोले हे नेते किंवा मंत्री नाहीत, ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांची भुमिका ही पक्षाची अधिकृत भूमिका मानली जाते. त्यामुळे नाना पटोले यांची भूमिका मविआला कमकुवत करणारी तसेच अडचणीत आणणारी आहे, असेही अजित पवारांनी सांगितल्याचे समजते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page