वेंगुर्ले /-


तौक्ते चक्रिवादळाचा फटका वेंगुर्ले तालुक्यातील ग्रामीण भागाबरोबर शहरी भागात बसला.वादळी वाऱ्यामुळे झाड कोसळून घरांची कौले व पत्र्यांचे नुकसान झाले.तसेच पाण्याच्या टाक्या फुटल्या.वेंगुर्ले तालुक्यामध्ये भाजपाच्या वतीने किनारपट्टी भागात सिमेंटचे पत्रे , ताडपत्री , पाण्याची टाकी तसेच रोख रक्कम देऊन मदतकार्य सुरुच ठेवले आहे.वेंगुर्ले शहरातील हाॅस्पीटलनाका व महाजनवाडी येथील अशाच गोरगरीब नागरिकांना भाजपाच्या वतीने जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते मदत देण्यात आली. .यावेळी प्रदेश कार्यकारिणी सदस्य शरदजी चव्हाण, जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई ,नगराध्यक्ष दिलीप गिरप,तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर,शहर अध्यक्ष सुरेंद्र चव्हाण, जि.का.का.सदस्य साईप्रसाद नाईक व वसंत तांडेल, मच्छिमार सेलचे जिल्हाध्यक्ष दादा केळुसकर, ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर, ता.चिटनीस जयंत मोंडकर,नगरसेवक प्रशांत आपटे,ओबीसी सेलचे शरद मेस्त्री , उदय ( नाना ) महाजन आदी उपस्थित होते यावेळी रेश्मा रमाकांत गोवेकर व पंढरी गणपत मांजरेकर यांना पाण्याच्या टाक्या देण्यात आल्या.तसेच मारुती कुडाळकर,प्रभाकर नेरुरकर , संतोष शिंदे,सुलोचना राणे,सोनु यशवंत परब,नंदकिशोर गवस , मिलिंद रणभिसे,वंदना सोझ, वृंदा चेंदवणकर यांना ताडपत्री देण्यात आल्या.यावेळी मदत दिल्याबद्दल भाजपाचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page