वेंगुर्ला /-


तौक्ते चक्रीवादळात किनारपट्टी भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीची वाट पाहायला लागू नये यासाठी सामाजिक जाणिवेतून सिंधुदुर्ग जिल्हा भाजपने मदतीचा हात पुढे केला आहे. आज बुधवारी वेंगुर्ले शहरात प्राथमिक स्वरूपात नुकसानग्रस्त ग्रामस्थांना ताडपत्री, पाण्याच्या टाक्या यांचे वाटप भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते सुरू करण्यात आले आहे.
चक्री वादळामध्ये नुकसान झालेल्या अनेकांची घरे अजून दुरुस्त करण्याचे काम चालू आहे. पावसामुळे घरात चिखल झालेला आहे. त्या सर्वांचा विचार करून तात्काळ स्वरूपात ताडपत्रीचे वाटप तसेच पाण्याच्या सोयीसाठी पाण्याच्या टाक्या वाटप करण्यात येत आहे. हे वाटप तालुक्यात नुकसानग्रस्त ग्रामस्थांत पर्यंत करण्यात येणार आहे, तसेच अजूनही मदत मुंबई भाजप कडून येत आहे, त्याचे वाटप करण्यात येईल, असे यावेळी राजन तेली यांनी सांगितले.या वाटपावेळी भाजपा प्रदेश सदस्य शरदजी चव्हाण, भाजप जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, न.प. नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप,भाजपा वेंगुर्ले तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर,
जिल्हा कार्यकारिणी सदस्य साईप्रसाद नाईक,वसंत तांडेल, माजी सभापती निलेश सामंत,
नगरसेवक प्रशांत आपटे,धर्मराज कांबळी,तालुका सरचिटणीस बाबली वायंगणकर व प्रशांत खानोलकर,शहरप्रमख सुरेंद्र चव्हाण,ता.चिटणीस जयंत मोंडकर,वृंदा गवंडळकर,सुषमा प्रभूखानोलकर,प्रार्थना हळदणकर,विजय नाईक वेतोरे,परबवाडा सरपंच पपू परब,मच्छिमार आघाडीचे दादा केळुसकर,
तुळस सरपंच
शंकर घारे, तालुका उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कर्पे,मनवेल फर्नांडिस,बुथप्रमुख वसंत परब,शिरोडा अध्यक्ष श्रीकृष्ण धानजी, शिरोडा उपाध्यक्ष् संतोष अणसुरकर, आरवली शक्ती केंद्रप्रमुख महादेव नाईक,विद्याधर धानजी, शिरोडा युवा मोर्चा अध्यक्ष सोमकांत सावंत,युवा मोर्चाचे राहुल नाईक, संदीप पाटील, विनय गोरे, पुंडलिक हळदणकर,प्रफुल्ल प्रभू यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page