मालवण /-

कोरोना सारख्या भीषण महामारीने देशभरातील सर्वच घटकांना आर्थिक फटका बसला असून यातून सावरण्यासाठी धोरणात्मक निर्णय तातडीने घेणे गरजेचे आहे.विशेषतः पर्यटन उद्योगाची मोठ्या प्रमाणात हानी झाली असून नोव्हेंबर २०२०ते फेब्रुवारी २०२१ या चार महिन्यांच्या कालावधी या क्षेत्रातील छोटे मोठे व्यवसायिक थोडी फार उभारी घेत असताना मार्चपासून कोरोना महामारीने देशभर हैदोस घातल्याने सगळ्यांचे कंबरडे मोडले आहे..आणि म्हणूनच समाजातील प्रत्येक घटकांनी आता एकमेकांना सावरण्यासाठी पुढे आलं पाहिजे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायिक अडचणीत असून भविष्यात त्यांना शासन स्तरावर पर्यटन व्यवसायला पुरक अशा निर्णयासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करू असे आश्वासन भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयातून डेप्युटी डायरेक्ट म्हणून सेवानिवृत्त झालेल्या सौ.निला लाड यांनी दिले.
सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यवसायिक महासंघाची पर्यटनाबाबत पुढील दिशा व नियोजन करण्यासाठी आभासी बैठक आयोजित केलेली होती त्यावेळी त्या बोलत होत्या. त्या १९७९पासून या चळवळीत सक्रिय असून भारतीय पर्यटन महामंडळाचे त्यांनी सिंगापूर, थायलंड,मलेशिया, म्यानमार, व्हिएतनाम, इंडोशिया अशा अनेक देशात प्रतिनिधित्व केलेल असून त्याचा फार मोठा फायदा परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी झालेला आहे.आपल्या सेवानिवृत्तीनंतरही त्या पर्यटन व्यवसायिकांना मार्गदर्शन करत असून त्या माध्यमातून अनेकांना त्यांनी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत आहेत.

कोरोनामुळे या व्यवसायिंकापुढे मोठे आव्हान निर्माण झालेले असून भविष्यात आपण सर्वांनी एकत्रित काम करून यावर मात करू शकतो असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.या बैठकीत पर्यटन महासंघाचे अध्यक्ष श्री बाबा मोंडकर यांनी या महासंघाच्या स्थापनेबाबतचा हेतू स्पष्ट केला.यावेळी झालेल्या चर्चेत कार्याध्यक्ष श्री सतीश पाटणकर, सचीव अँड.नकुल पार्सेकर, उपाध्यक्ष श्री. डि.के.सावंत,सोशल मिडिया प्रमुख श्री किशोर दाभोलकर, सावंतवाडीचे अध्यक्ष श्री जितेंद्र पंडीत, मालवणचे अध्यक्ष श्री. अविनाश सामंत आदी पदाधिकारी सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page